लष्कराबद्दल भारतात प्रचंड आदर आहे. भारताचे शेजारी देश आणि त्यांच्या कारवाया बघता त्या पार्श्वभूमीवर भारताच्या सीमा सुरक्षित ठेवणे हे मोठे दिव्य काम भारतीय लष्कर स्वतःच्या जीवावर उदार होऊन करत असते. देशात कोठेही आपत्ती ओढवली तर अशाही वेळी सर्वात आधी लष्कराला पाचारण केले जाते. लष्कर आल्यावर आता हे संकट दूर होईल याचा मोठा दिलासा अशावेळी मिळतो. या सर्व गोष्टींमुळे लष्कराशी निगडित प्रत्येक गोष्टीबद्दल देशवासियांना आदर आहे. लष्कराचे रणगाडे कुठे दिसले तरी उर भरून येतो. सैन्यातून सुटीवर येणारे जवान दिसले तरी त्यांच्याबद्दल आपल्याला आदरच वाटतो.
भारतीयांना असलेल्या हेच लष्करप्रेम किती भिनलेले आहे याचा प्रत्यय बंगलोर येथे घडलेल्या एका घटनेतून येऊ शकतो. एक लहानसे पोरगं आपल्याला पालकसोबत रस्त्यावरून जात असताना त्याला आर्मी टॅंक दिसला. हा टॅंक दिसल्यावर या पोराने काय करावे?
