यश, ध्येय हे शब्द माणसाला जगण्याची एक वाट दाखवून देतात. ही वाट चालत राहणे, प्रयत्न करत राहणे हे आयुष्याचे उद्दिष्ट बनल्यानंतर आयुष्याला आपण आपोआप एक अर्थ देत असतो. पर्सिस्टंट सिस्टम्सचे फाऊंडर आणि चेअरमन आनंद देशपांडे यांचा नुकताच अब्जाधीशांच्या यादीत समावेश झाला आहे.
आनंद देशपांडे यांनी १९९० साली त्यांनी पर्सिस्टंट सिस्टिम्सची स्थापना केली होती. तेव्हापासून आजरच्या त्यांच्या ह्या यशाचे रहस्य जाणून घ्यायला बरेच लोक उत्सुक असतील. चला तर जाणून घेऊया आनंद देशपांडे ह्यांच्या आयुष्यातील प्रेरणा, त्यांचा यशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि बरंच काही...
असं म्हणतात की बदल माणसाच्या आयुष्यात स्थिर असतो. अब्जाधीश झाल्यानंतर देशपांडे यांच्या आयुष्यातही बरेच बदल झालेले असणार. चला मग पाहूया आनंद देशपांडे यांच्या आयुष्यात कोणकोणते बदल झाले आहेत..
याबद्दल एका मुलाखती मध्ये सांगिताना त्यांनी सांगितले की, अब्जाधीश झाल्यानंतर मला ओळखणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी भेटलेली माणसे येऊन आपण अमक्या ठिकाणी भेटलो होतो, ह्या गप्पा केल्या होत्या हे सर्व आठवणीने सांगत आहेत. बाकीचे काही म्हणावे तसे बदलले नाहीये. यश मिळणे ही आंनदाची गोष्ट असतेच. पण प्रत्येक सफलता स्वतःसोबत एक जबाबदारी घेऊन येते. आता ह्या यशाच्या स्थिरतेसाठी प्रयत्नशील राहावे लागणार आहे. जर शेअर्सच्या किमतीमध्ये थोडा जरी फरक पडला, तरी कमाई १ बिलियन डॉलर वरून ९०० मिलियन डॉलर वर येऊ शकते.



