आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक सण साजरा करण्यामागे कोणता ना कोणता विचार समाजाला द्यायचा प्रयत्न आपल्या पूर्वजांनी केलेला दिसतो. म्हणजे फक्त मोठ्या सणांबद्दल नव्हे तर सर्व छोटे सण सुद्ध खूप विचार करून केले असावेत. जसं की आज बैल पोळा आहे. शहरी लोकांना याबद्दल खूप कमी माहिती असेल पण आजही महाराष्ट्र आणि इतर अजून बऱ्याच राज्यातील ग्रामीण भागात हा सण खूपच उत्साहात साजरा केला जातो.
भारत हा कृषीप्रधान देश आहे बहुसंख्य लोक आपल्याकडे शेती करतात. शेती मध्ये आज जरी अनेक आधुनिक गोष्टींचा वापर होत असला तरी पूर्वपार बैलांचा शेतीच्या कामामध्ये खूप मोठा वाटा होता. वर्षभर दमलेल्या आपल्या या शेतीमित्राला एक दिवसाचा आराम म्हणून बैल पोळा हा सण साजरा केला जातो.


