सध्या युद्ध हा शब्द जरी ऐकला तरी अंगावर काटा येतो. जगातील इतिहासात एकमेकांचा ताबा मिळविण्याची स्पर्धा, किंवा कुरघोडी करण्यासाठी युद्ध केली गेली. कोणत्याही युद्धात दोन्ही बाजूंची हानी होते. भारतीय इतिहासात अनेक भीषण युद्धांच्या कथा आहेत. त्यात शूरता दिसतेच, पण त्याचबरोबर होणारी हानी कधीही भरता येत नाही. पण काही ठिकाणी युद्ध रोखण्यासाठी तह होतात, प्रसंगी शरणागतीही पत्करली जाते. त्यासाठी पांढरे झेंडे दाखवले जातात. आज जाणून घेऊयात की शरणागती स्वीकारताना पांढरा रंगच का वापरतात आणि हे झेंडे दाखवण्याचा इतिहास काय आहे?
युद्धादरम्यान जेव्हा एक बाजूचे सैन्य पराभूत होते किंवा ते पराभूत होणार आहे याची खात्री होते तेव्हा त्या बाजूच्या सैन्याकडून पांढरा झेंडा दाखवून युद्धविराम आणि आत्मसमर्पण सूचित केले जाते. पांढरा ध्वज हा युद्धविराम आणि आत्मसमर्पणाचे प्रतीक आहे.

