भारतात ‘आर्म्ड फोर्सेस स्पेशल पॉवर्स अॅक्ट’ ऊर्फ ‘अफ्स्पा’ नावाचा कायदा आहे. आपल्याकडे मुख्यतः सीमेलगत जे प्रदेश अशांत, अस्थिर आहेत त्या प्रदेशांसाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार आहेत. या कायद्याअंतर्गत मणिपूरसारखी ईशान्येकडील राज्ये, जम्मू-काश्मीर येथे तैनात केलेल्या लष्कराला काही विशेष अधिकार मिळतात.
पण हा कायदा बराच वादग्रस्त ठरत आला आहे. काही प्रांतांत लष्कराने या अधिकाराचा गैरवापर केला असा आरोप केला जातो. अनेकदा लष्कराने अधिकारांचा गैरवापर केला आणि काही जणांचे जीव गेले असा आरोपही होताना दिसतो. यासंबंधी सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आल्या आहेत.
त्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने या कायद्याविषयी महत्त्वाचा निर्णय जारी केला. त्यानुसार आता ज्या ठिकाणी अफ्स्पा कायदा लागू होतो, अशा अशांत क्षेत्रांमध्येही भारतीय लष्कर किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस या कायद्याचा वापर करून मोठ्या प्रमाणावर किंवा प्रत्युत्तरादाखल हल्ले करू शकणार नाहीत. त्यामुळे आत्तापर्यंत लष्कराला या कायद्यान्वये दिलेल्या विशेष अधिकारांना धक्का बसला आहे. आता जाणून घेऊ या वादग्रस्त कायद्याविषयी दहा महत्त्वाचे मुद्दे.











