उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. तापमानात प्रचंड वाढ होत आहे. याचा फटका जसा पक्षी, प्राणी आणि माणसांना बसतो आहे तसाच तो इ-स्कूटर्सनाही बसतो आहे. इ-स्कूटर दळणवळण क्षेत्रातील एक नवी नांदी ठरेल अशी अशा वाढत असतानाच भारतात ठिकठिकाणी इ-स्कूटरने अचानक पेट घेण्याच्या घटना वाढत असल्याचे पाहून ही आशा लवकरच फोल ठरेल की काय, अशी शंका वाटत आहे.
गेल्या आठवड्यात भारतात ठिकठिकाणी ओला, ओकिनावा आणि प्युअर इव्ही सारख्या कंपन्यांच्या गाड्यांनी अचानकच पेट घेतला. यात कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी या गाड्यांचे असे अचानक पेट घेणे खूपच चिंतेत टाकणारे आहे. या घटनांमुळे अशा गाड्यांच्या सुरक्षिततेवरच प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे. विशेषत: या इ-स्कूटरला चार्ज्ड ठेवणाऱ्या बॅटऱ्या खरच सुरक्षित आहेत की यामुळे नवे धोके निर्माण होऊ शकतात, याबद्दल प्रत्येकाच्याच मनात धास्ती आहे.
इ-स्कूटर्स पेट का घेत आहेत, हे तपशीलवार जाणून घ्या!!


