पाश्चिमात्य उद्योगजगतात आणि आपल्याकडेसुद्धा गेल्या काही वर्षांत जे अनेक घोटाळे उघडकीला आले आणि आजही येत आहेत; त्यामुळे कॉर्पोरेट गव्हर्नन्स या संकल्पनेविषयी खूपच चर्चा होत आहे. उद्योगाच्या आर्थिक परिस्थितीच्या संदर्भात,प्रामुख्याने व्यवहारात लाचखोरी होत नाही या अर्थाने,कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे महत्त्व आहे असे आत्तापर्यंत मानले जात होते,पण आता याचा संबंध समाज जीवनाशी सुद्धाआहे, हा विचार बळावतो आहे.
कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे इतके विविध पैलू आहेत, की याची आतापर्यंत सर्वमान्य अशी व्याख्या केली जाऊ शकली नाही. म्हणून जो तो, आपल्याला जो पैलू महत्त्वाचा वाटतो, त्यानुसार त्याची व्याख्या करत आला आहे आणि येत्या काळात बदलत्या पैलूंमुळे त्यात बदल होत राहील म्हणून आपण आतापर्यंत केलेल्या व्याख्यांचा आढावा घेऊ या.



