आयसीसी आयोजित करत असलेल्या क्रिकेटच्या जवळपास सर्वच स्पर्धा भारतात तरी लोकप्रिय आहेत. यातील एक महत्वाची स्पर्धा म्हणजे अंडर १९ वर्ल्डकप. या स्पर्धेत जिंकणे म्हणजे देशाचे नाव तर मोठे होत असतेच, पण या स्पर्धेतून भविष्यात भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू पण समोर येतात.
यंदा १४ वी अंडर १९ स्पर्धा १४ जानेवारीपासून सुरू होत आहे. यंदाची स्पर्धा वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आली आहे आणि १६ संघ विजेतेपदासाठी भिडणार आहेत. वेस्ट इंडिजमध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित होत आहे. १९८८ साली पहिल्यांदा सुरू झालेली ही स्पर्धा नवख्या खेळाडूंना भविष्यात आपापल्या संघात प्रवेश मिळवण्यासाठी महत्वाची असते.
भारत हा दरवेळच्या स्पर्धेत भाग घेणारा सर्वात जुना संघ आहे. भारतासोबतच सामील होणाऱ्या प्रत्येक संघाला विजेतेपदाची आस लागलेली आहे. या स्पर्धेत एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत.
हे १६ संघ खालीलप्रमाणे ग्रुप्समध्ये विभागण्यात आले आहेत.






