महाराष्ट्राने आजवर भारतीय क्रिकेट संघाला अनेक दिग्गज दिले. सर्वात जास्त ताकदीचे खेळाडू महाराष्ट्रानेच दिले असे म्हटले तरी हरकत नाही. मराठी तरुणांनी आजवर आपल्या कर्तृत्वाने भारतीय संघाला नव्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. आता याच यादीत एक नवे नाव जोडले जात आहे.
ऋतुराज गायकवाड या मराठमोळ्या खेळाडूची श्रीलंका दौऱ्यासाठी निवड झाली. धोनीच्या मनावर गारुड केलेला खेळाडू म्हणून ऋतुराजला ओळखले जात होते. त्याच्या निवडीने 'बंदे मे दम है' ही गोष्ट सिद्ध होत आहे.







