भारताच्या पुरुष आणि महिला हॉकी संघाने तडाखेबंद खेळ दाखवत यंदा ऑलिम्पिकमध्ये मोठी मजल मारली. महिला हॉकी संघाने क्वार्टर फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला माती चारत सेमी फायनलमध्ये प्रवेश केला होता.
या यशाचे श्रेय सर्वच संघाला असले तरी कॅप्टन म्हणून राणी रामपाल या खेळाडूची जबाबदारी आणि श्रेयसुद्धा मोठे आहे. राणी रामपाल साधीसुधी खेळाडू नाही. तिच्या नावावर अनेक विक्रम आहेत. २०१० साली वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षी भारतासाठी वर्ल्डकप खेळणारी ती सर्वात कमी वयाची खेळाडू होती, तर 'वर्ल्ड गेम्स ऍथलिट ऑफ द इयर' हा पुरस्कार मिळवणारी जगातली पहिली हॉकी खेळाडू आहे.


