जावेद अख्तर यांनी गब्बर सिंग विषयी बोलताना एकदा म्हटलं होतं की “गब्बर सिंग गाजला कारण गब्बर सिंगची मागची स्टोरी कोणालाच माहित नव्हती.” हे खरंही आहे. गब्बर सिंगला कोणताही भावनिक मुलामा नव्हता. तो क्रूर होता आणि बंडखोर होता. लोकांच्या मनातील विकृतीला त्याने अस्तित्वात आणलं. हे सगळं करत असताना त्याच्या मागचं कारण म्हणून कोणतीही भावनिक कथा त्याला चिकटलेली नव्हती.
असंच काहीसं आंतरराष्ट्रीय दर्जावर एका पात्राच्या बाबतीत घडलं आहे. ते पात्र म्हणजे “दि जोकर”.











