कोरोना सध्या भारतात आवरला गेला असला तरी कधी तिसरी लाट येईल सांगता येत नाही. या क्षेत्रातील तज्ञ रोजच्या रोज वेगवेगळे भाकीत व्यक्त करत आहेत. कोरोना विरुद्ध लढ्यातील सर्वसामान्य जनतेचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे मास्क आहे.
मास्कचा वापर करूनच आपण कोरोनाला दूर ठेऊ शकतो. जसा मास्कचा वापर कमी झाला तसे सर्वबाजूने मास्क वापरा म्हणून सूचना सुरू होतात त्यामागे हेच कारण आहे की मास्कमुळे आपण कोरोनाला दूर ठेऊ शकतो.





