अहिराणी गाणी सध्या देशभर धिंगाणा घालत आहेत. बबल्या इकस केसावर फुगे या गाण्याला तर तब्बल ८५० लाख व्ह्यूज आले आहेत. सगळीकडे बबल्याचीच चर्चा आहे. सचिन कुमावत यांनी या गाण्याच्या माध्यमातून प्रभावीपणे ग्रामीण भागातील बेरोजगारीवर भाष्य केले आहे. अहिराणी गाणी म्हटली म्हणजे सहसा कानबाईचीच गाणी डोळ्यासमोर येतात. पण त्याव्यतिरिक्त सुध्दा अहिराणी गाणी खूप लोकप्रिय आहेत राव!! त्यातलाच एक प्रकार म्हणजे पावसाळी गाणी.
बाकीच्या लोकगीत प्रकारांबद्दल नंतर कधीतरी तुम्हाला सांगूच, पण सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. पावसाळ्याचे दिवस म्हणजे वातावरणात एक वेगळीच फिलिंग असते राव!! अशा या प्रसन्न वातावरणात आहिराणी गाणे, ते पण पावसावरचे असेल तर मेजवानी असते मंडळी!! आज आम्ही अशाच काही पावसाळी अहिराणी गाण्यांची तुम्हाला ओळख करून देणार आहोत...




