आज जागतिक हृदय दिन. हृदयविकाराबद्दल जनजागृती व्हावी म्हणून २९ सप्टेंबर हा ‘जागतिक हृदय दिन’ म्हणून साजरा केला जातो.
दरवर्षी जगभरातले १ कोटी ७५ लाख लोकांच्या मृत्यूमागे हृदयविकार हे कारण असतं. हृदय विकार आणि भारत असा विचार केला तर दिसेल हृदयविकारामुळे मृत्यू होणाऱ्यांचा आकडा हा खेड्यांपेक्षा शहरी भागात जास्त आहे. पण नुकत्याच आलेल्या अहवालानुसार ही तफावत सुद्धा आता भरून निघू शकते. याचं कारण २००० ते २०१५ पर्यंतचा अहवाल बघितला तर खेड्यातल्या लोकांमध्ये हृदयविकाराचं प्रमाण ४० टक्क्यांनी वाढलं आहे. याहूनही जास्त चिंतेची बाब अशी की भारतात सरासरी हृदय विकार होण्याची वयोमर्यादा ८ ते १० वयापर्यंत घसरली आहे. हृदय विकाराला बळी पडलेले ४० टक्के भारतीय हे ५५ पेक्षा कमी वयोगटातील आहेत. ही नक्कीच धोक्याची सूचना म्हणता येईल.
अनियमित आहार, व्यायामाचा अभाव, व्यसन आणि ताणताणाव ही हृदय विकाराची काही मुख्य करणं आहेत. रोजच्या कामाच्या धावपळीत आहार आणि व्यायामासारख्या गोष्टींकडे साफ दुर्लक्षित करतो. २४ तासांमधून थोडावेळ आपण हृदयासाठी काढला तरी हृदय ताजंतवानं राहायला मदत होते.
चला तर आज जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने पाहूयात हृदयाची काळजी घेण्याचे ७ उपाय...











