जागतिक वारसा स्थानांच्या (World Heritage Sites) यादीत भारतातल्या वेगवेगळ्या स्थळांचा समावेश होतो. जसे की महाराष्ट्रातल्याच अजिंठा-वेरूळ गुहा असतील, कर्नाटकचं हम्पी हे गाव असेल किंवा ताजमहाल सारखी ऐतिहासिक वास्तू असेल. सांस्कृतिक आणि भौगोलिकदृष्ट्या महत्वाच्या स्थानांना युनेस्कोने आपल्या यादीत स्थान दिलं आहे. एकदा का एखादं स्थळ जागतिक वारसा यादीत सामील झालं, की त्याच्या देखभालीची आर्थिक जबाबदारी युनेस्को घेतं. भारत हे जगातल्या तब्बल ३६ जागतिक वारसा स्थळांचं घर आहे. या आधारावर भारताचा जगात ६वा क्रमांक लागतो.
मंडळी, आज आम्ही घेऊन आलो आहोत या ३६ मधून १३ निवडक स्थळांची यादी. ही यादी बघून तुम्हालाही तेथे जाण्याचा मोह आवरणार नाही. चला तर पाहूया !!
















