६ ते १४ वयातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचं शिक्षण दिलं पाहिजे असं भारतीय घटनेच्या कलम क्रमांक २१-अ मध्ये नमूद केलं आहे. या कायद्याप्रमाणे प्रत्येकालाच शिक्षणाचा अधिकार मिळतो, पण कायदा किती प्रमाणात पाळला जातो? नुकतंच एका नामांकित बिस्कीट कंपनीच्या कारखान्यात तब्बल २७ बालकामगार आढळले आहेत. ही मुलं कारखान्यातच राहत होती आणि त्यांचा बाहेरच्या जगाशी संपर्क नव्हता.
ही नामांकित बिस्कीट कंपनी म्हणजे भारतातली सगळ्यात लाडकी बिस्कीट कंपनी “पार्ले-जी”...







