रंग दे बसंती सिनेमाचं कथानक हे भारतीय वायू सेनेतील अधिकाऱ्याभोवती फिरतं. जुनाट तंत्रज्ञान आणि खराब जेटमुळे अजय सिंग राठोड (आर. माधवन) या फ्लाइट लेफ्टनंटचा विमान अपघात मृत्यू होतो. अशीच काहीशी घटना नुकतीच बंगलोर येथे घडली. भारतीय वायुसेनेतील Mirage 2000 हे विमान बंगलोर येथे कोसळलं. २ पायलटांचा यात जीव गेला. दोघेही नवीन तंत्रज्ञानाची चाचणी करत होते.
मंडळी, वायू सेनेच्या आजवरच्या इतिहासाकडे एकदा नजर टाकली की समजतं असे प्रकार या पूर्वीही घडले आहेत. अशा प्रकारचे आजवर ९ अपघात घडले आहेत. या सगळ्या अपघातांच्या मागे खराब तंत्रज्ञान हे एक प्रमुख कारण होतं.
चला तर आज या ९ दुर्दैवी घटनांबद्दल जाणून घेऊया.













