टागोर म्हटलं की आपल्याला आठवतात ‘जन गण मन’ लिहिणारे नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर, पण आज आपण एका अज्ञात टागोरांना भेटणार आहोत. हे अज्ञात टागोर म्हणजे रवींद्रनाथ टागोर यांचे पुतणे अबनिन्द्रनाथ टागोर (७ ऑगस्ट १८७१ - ५ डिसेंबर १९५१). त्यांच्याबद्दल फारच कमी लोकांना माहित आहे. इंग्रजांनी भारतावर पूर्ण नियंत्रण आणलेल्या काळात अबिनिन्द्र्नाथांनी इंग्रजांशी एका वेगळ्या प्रकारे लढा दिला. हा लढा होता कलेच्या माध्यमातून.
चला तर आज जाणून घेऊया इतिहासातील एका अज्ञात टागोरांना.






