मंडळी, इमर्जन्सी मध्ये जसे की रूळ तुटलेला असेल किंवा दुरून कोणीतरी रूळ पार करताना दिसत असेल तर ट्रेन ड्रायव्हरला इमर्जन्सी ब्रेक लावण्याचा अधिकार असतो. समजा ड्रायव्हरला रेल्वे रुळावर कोणी तरी दिसलं आणि त्याने इमर्जन्सी ब्रेक लावले, तरी ट्रेन जवळजवळ ८०० ते ९०० मीटर पर्यंत जाऊनच थांबेल. म्हणजे जर ड्रायव्हरला लांबवर कोणीतरी रुळावर दिसलं तरच त्याचा जीव वाचणं शक्य आहे. पण अनेकदा असं होतं की, अचानक कोणीतरी ट्रेनच्या समोर येतं. अशावेळी ड्रायव्हरला ब्रेक लावण्यासाठी वेळच मिळत नाही. शिवाय इमर्जन्सी ब्रेक दाबल्याने निर्माण झालेल्या टॉर्क मुळे गाडी रुळावरून खाली येऊ शकते. गाडीची लांबी हा इथे महत्वाचा भाग असतो.
ब्रेक लावण्याच्या कार्यप्रणालीकडे एकदा बघितलं तर काही मीटर वर असलेला माणूस ट्रेन खाली चिरडण्यापासून वाचवणं हे ड्रायव्हरच्या हातात नसतं हेच दिसून येईल.
मंडळी, तर अशा प्रकारे ट्रेनचेब्रेक्स काम करतात. शक्यतो रेल्वे रूळ पार करणं टाळा कारण कदाचित ब्रेक लावलेले असतानाही ट्रेन तुम्हाला वाचवू शकणार नाही.
आणखी वाचा :
चादरी, ब्लँकेट्स, टॉवेल्स, खिडक्या, नळाच्या तोट्या...पाहा बरं भारतीयांनी रेल्वेच्या किती कोटींवर डल्ला मारलाय ?
टर्मिनस, सेन्ट्रल, जंक्शन मधला फरक माहित्ये का ?
रेल्वेच्या डब्यावर हे नंबर का असतात भाऊ ? काय आहे या मागील लॉजिक ?
नागपूरकरांनो, नागपूर रेल्वे स्थानकाबद्दल या गोष्टी माहित आहेत का ?
मुंबईकरांनी असं काय केलं की कोणालाच विश्वास बसला नाही ??
'काला बकरा' ते 'सिंगापूर रोड' - भारतातील ११ मजेदार रेल्वे स्टेशन्स !!