२६ डिसेंबर, २००४ रोजी हिंदी महासागरात आलेला भूकंप हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भूकंप होता. या भूकंपाचं केंद्रस्थान इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटानजीक होतं. ह्या भूकंपानंतर त्सुनामीचं अक्षरशः तांडव सुरु झालं. इंडोनेशिया, श्रीलंका, भारत, थायलंड अशा १४ देशांमध्ये त्सुनामीने तब्बल २.३ लाख लोकांचा बळी घेतला. या प्रलयातही एक आदिवासी जमात मात्र आश्चर्यकारकरीत्या तग धरून राहिली. त्यांनाच खऱ्या अर्थाने समुद्राचा बदलणारा नूर समजला होता. ही जमात म्हणजे इंडोनेशियाची ‘बजाऊ लाऊत’ जमात.
चला तर जाणून घेऊया समुद्रावर राहणाऱ्या एकमेव भटक्या आदिवासी जमातीबद्दल.














