कोरोनाव्हायरस आल्यापासून लोकांनी आपल्या परीने उपचार शोधले आहेत. कोणी म्हणतंय की लसूण खा तर कोणी म्हणतंय की प्रत्येक १५ मिनिटांनी पाणी प्या. एक अफवा तर अशी पसरली की द्रव स्वरूपातील चांदी असलेलं प्यायल्याने कोरोनाव्हायरसचा आजार कमी होतो. यातील एकही उपाय वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेला नाही.
आज हे सांगण्याचं कारण असं की इराणमध्ये अशाच एका अफवेने ४४ जणांचा जीव घेतला आहे.






