हवामानातील बदल म्हणा किंवा जंगलतोड म्हणा, प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर पोचले आहेत. सप्टेंबरमध्ये आलेल्या अहवालाने भारतीय चित्ता नामशेष झाल्याचं जाहीर केलंय.
२००८ साली वर्ल्ड वाईल्डलाईफ फंड जपानने एका अनोख्या पद्धतीने या जागतिक समस्येकडे लोकांच लक्ष वेधून घेतलं होतं. त्यांनी एक मोहीम चालवली होती. त्याचं नाव होतं Pixel campaign. एखाद्या प्राणी प्रजातीची जगभर जेवढी संख्या उरली असेल तेवढी त्या फोटोत पिक्सेल्स असतील अशी ही कल्पना होती. उदाहरणासाठी हा फोटो पाहा.










