भारतातल्या तरुण पिढीविषयी अनेकदा नकारात्मक लिहिले जाते. ती कशी बेजाबदार आहे, आळशी आहे असं काहीसे चित्र बऱ्याचदा उभे केले जाते.. पण हे खरे आहे का? नक्कीच नाही! आजची तरुण पिढी अगदी कमी वयात नोकरीमध्ये कितीतरी वरची पदे यशस्वीपणे सांभाळात आहे. अगदी स्वतःचा व्यवसाय किंवा आपले समजाविषयीचे कर्तव्यही अगदी आत्मविश्वासाने बजावत आहे. वेगवेगळ्या आणि नवीन क्षेत्रात हे तरुण आपल्या भारताचे नाव जगभरात पोहोचवत आहेत. अशा भारतीय तरुण आणि तरुणींची दखल खुद्द फोर्ब्सने घेतली आहे.
फोर्ब्स इंडियाने ३० अंडर ३० ची यादी जाहीर केली आहे. या यादीत कर्तबगार भारतीय तरुणांचा गौरव केला आहे. गेले वर्षभर वय वर्षे ३०च्या आतील ज्या तरुणांनी स्वतःच्या कौशल्याने आपापल्या क्षेत्रात मेहनत घेऊन यश मिळवले त्यांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे. या यादीतील काही मोजक्या तरुणांवर बोभाटा लेखमालिका घेऊन येत आहे.
आजच्या भागात कृषी क्षेत्रातील ६ तरुण चेहऱ्यांना भेटूया.










