गोव्यात दरवर्षी ७० लाख पर्यटक येत असतात. एवढ्या मोठ्या प्रमाणात लोकांचा राबता असतो म्हणजे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात प्रदूषणही आलंच. गोव्यात सध्या कचऱ्याची समस्या शिगेला पोहोचली आहे. हा प्रश्न सोडवायला सरकारी यंत्रणाही कमी पडत आहेत. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकच काहीतरी भन्नाट आयडिया शोधून काढतात. गोव्यातही कचरा प्रश्नावर असाच उपाय शोधण्यात आला आहे. गोव्यात कचऱ्याच्या बदल्यात चक्क फुकट बियर दिली जात आहे भाऊ.
चला तर या भन्नाट कल्पनेविषयी जाणून घेऊ या !!








