आजच्या घडीला कार सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. अगदी महागड्या गाड्या परवडत नसल्या तरी लोकांकडे गेलाबाजार नॅनो, मारुती ८०० किंव अल्टो तरी असतात. स्वत:कडे नसली तरी जवळच्या कुणाकडे कार नक्कीच असते. ही कार नावाची वस्तू गेली किमान ७० वर्षं रस्त्यांवर फिरतेय.
आता जरी भारतातल्या खेड्यापाड्यांमध्येही कार दिसायला लागल्या आहेत. पण एकेकाळी अगदी मोजक्या गाड्या रस्त्यांवर फिरत असत. भारतात पहिली कार जमशेदजी टाटांनी घेतली हे सगळ्यांना माहीत असतं, पण भारतात पहिली कार केव्हा, कुठे आणि कशी तयार झाली हे मात्र खूप कमी लोकांना माहित असते. चला तर मग जाणून घेऊया भारतातल्या पहिल्या कारबद्दल!!!






