आज पोलिस असो किंवा परराष्ट्र मंत्रालय एका ट्विटने तुमच्या पर्यंत मदत पोहोचते. रेल्वे प्रशासनही आता याच वेगाने काम करत आहे. आपल्याला फक्त ट्विट मधून आपली समस्या मांडून त्या त्या विभागाला tag करावं लागतं. एवढं केलं की मदत आली म्हणूनच समजा.
मंडळी, हे झालं आजच्या सोशल मिडीयाच्या काळातलं, पण ज्या काळी सोशल मिडियाच काय साधा फोनपण नसायचा त्याकाळी इमर्जन्सीच्या वेळी मदत कशी मिळत असेल ? याचा एक अंदाज येण्यासाठी आम्ही तुम्हाला एक किस्सा सांगणार आहोत.
या गोष्टीतील पात्र फार मजेशीर आहेत. शंतनू दासगुप्ता नावाचे इस्रो शास्त्रज्ञ, त्यांची वृद्ध आई, रेल्वे व्यवस्थापक, टीटी, लाईनमन, वर्तमानपत्र आणि एक कांदा. हो कांदा !!!







