दुसरं महायुद्ध नुकतंच संपलं होतं आणि ब्रिटिशांच्या साम्राज्यावरचा कधीही न मावळणारा सूर्य आता पश्चिमेकडे झुकला होता. भारताचं स्वातंत्र्य आता दूर नव्हतं. संपूर्ण जगाचं लक्ष या महत्वपूर्ण घटनेकडे लागलं होतं. अखेर १५ ऑगस्ट १९४७ या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्याच्या बदल्यात देशाचे तुकडे झाले. फाळणीमुळे घडलेल्या दंगली आणि अत्याचाराने या आनंदाला गालबोट लागलं.
भारताच्या इतिहासासोबत जागतिक इतिहासाच्या पातळीवर या अत्यंत महत्वपूर्ण घटना होत्या. जगाने या घटनांकडे कशा पद्धतीने बघितलं हे बघणं आजच्या दिवशी महत्वाचं ठरेल.
चला तर आज पाहूयात जगातील प्रमुख वृत्तपत्रांनी भारताच्या स्वातंत्र्याचं कोणत्या शब्दात वर्णन केलं...














