पाणी ही काय तस्करी करण्याची वस्तू आहे का ? आणि जे सरकार तस्करांना शासन करते ते स्वतःच तस्करी कशी करेल ? असे प्रश्नही तुमच्या मनात आले असतील. पण वाचकहो, जे शिर्षकात लिहीलंय ते पाश्चिमात्य देशांच्या दृष्टीने १०० टक्के सत्य आहे. आपण ८०च्या दशकात तस्करी केली होती आणि ती पण पाण्याची ? आता सरकारने केल्यावर त्याला तस्करी म्हणता येणारच नाही पण पाण्याची तस्करी ? तर, हे तस्करी केलेलं पाणी साधंसुधं पाणी नव्हतं. शास्त्रज्ञांच्या भाषेत ज्याला हेवी वॉटर म्हणतात असं ते खास जड पणी होतं.
आधी आपण जाणून घेऊ या काय खास आहे या पाण्यात ?












