एक स्वतंत्र, सार्वभौम आणि लोकशाही देश म्हणून भारताने २६ जानेवारी १९५० रोजी राज्यघटनेची अंमलबजावणी केली. तेव्हापासून, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून भारत दरवर्षी एक भव्य समारंभ साजरा करतो. हा सोहळा दूरदर्शनवर आपण पाहतो आणि त्यात सम्पूर्ण भारतीय संस्कृतीचे दर्शन परेडद्वारे दाखवले जाते. परेड ही आकर्षक असतेच त्याशिवाय दरवर्षी भारत सरकारकडून परदेशी नेत्यांना आमंत्रित केले जाते. याचीही सर्वाना खूप उत्सुकता असते.
यावर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी आपला भारत दौरा रद्द केल्यानंतर २६ जानेवारी २०२१ ला भारतीय वंशाचे सूरीनामचे अध्यक्ष चंद्रिकेश्वरसाद संतोखी (Chandrikapersad Santokhi) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.












