गोष्ट महाराष्ट्रातली आहे. औरंगाबाद येथील पोखरी गावाने एक कौतुकास्पद निर्णय घेतलाय. धार्मिक विधींमध्ये ज्या गोष्टी वापरल्या जातात त्या एकदा वापरल्या की त्यांचा काहीच उपयोग होत नाही. पण हाच खर्च जर शिक्षणावर केला तर त्यातून मिळणारं ज्ञान हे पुढे अनेक पिढ्या वाढतच जातं. हाच विचार करून गावातल्या धार्मिक विधींना लागणारा पैसा आता जिल्हा परिषदेची शाळा बांधण्यासाठी वापरण्यात येणार आहे.
आजच्या लेखात आपण पोखरी गाव आणि तिथल्या शाळेबद्दल जाणून घेणार आहोत.







