BMC ने आरे कॉलनीतील २७०० झाडांना तोडण्याची परवानगी दिल्याची बातमी तुम्ही आज वाचलीच असेल. गेल्याच आठवड्यात अमेझॉनच्या आगीने थैमान घातलं होतं. दिवसेंदिवस अशा प्रकारे वन्य भाग कमी होत जात आहे आणि जागतिक तापमान वाढीची गती दिवसेदिवस वाढत आहे. हे डोळ्यांसमोर दिसत असूनही आपण काही करत नाहीय, पण काही लोक आहेत ज्यांनी फेसबुक, ट्विटर, वर चिंताजनक पोस्ट न टाकता खऱ्या कामाला सुरुवात केली आहे.
आम्ही मणिपूरच्या मोईरंगथेम लोईया या व्यक्तीबद्दल बोलत आहोत. त्याने ३०० एकर जागेत जंगल निर्माण केलं आहे. कौतुक म्हणजे हे काम त्याने एकट्याने केलंय. यासाठी त्याने आपलं संपूर्ण आयुष्याच खर्ची घातलं आहे. तो गेल्या १७ वर्षापासून झाडे लावण्याचं काम करतोय.









