ज्या मुलांनी इतरांचा जीव वाचवण्यासाठी वेळी स्वतःचा जीव धोक्यात घातला अशा शूर मुलांना दरवर्षी प्रजासत्ताक दिनी शौर्य पदकाने गौरवण्यात येतं. या पुरस्कारासाठी १६ वर्षाखालील मुलं निवडण्यात येतात. यावर्षी २१ मुलांना शौर्य पदक देण्यात आलं आहे. यातील ३ मुलांना हा पुरस्कार मरणोत्तर देण्यात आला.
आज आम्ही घेऊन आलो आहोत या २१ मधल्या निवडक अशा ५ मुलांच्या हकीकती. त्यांनी दाखवलेलं शौर्य अंगावर काटा आणणारं आहे.









