१९७१ चे भारत पाकिस्तान युद्ध, ज्यात बांग्लादेश पाकिस्तानातून वेगळा होऊन एक स्वतंत्र देश झाला होता. भारताच्या इतिहासातच नाहीतर जगाच्या इतिहासात देखील याचे एक महत्वपूर्ण स्थान आहे. या युद्धात भारतीय सैनिकांनी असामान्य कामगिरी करत पाकिस्तानला पाणी पाजले होते. या युद्धातील महत्वाच्या शिलेदारांपैकी एक होते सेकंड लेफ्टनंट अरुण खेतरपाल!!
खेतरपाल यांच्या पराक्रमाची चर्चा केल्याविना १९७१ च्या युद्धाची गोष्ट अपूर्ण आहे. भारत पाकिस्तान युद्धात असामान्य कर्तृत्व गाजवत अरुण खेतरपाल शहीद झाले होते. शत्रूच्या उपस्थितीत त्यांनी दाखवलेल्या शौर्यामुळे त्यांना मरोणोत्तर परमवीर चक्र देण्यात आले होते. वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी त्यांना हा सन्मान मिळाला होता.







