भारताच्या स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानने प्रत्येकवेळी त्यांच्या वाईट स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कितीही कारस्थानं रचली आणि वेळोवेळी भारतीय सैनिकांनी त्यांची ती षड्यंत्रं हाणून पाडली आहेत. भारताने पाकिस्तानला वेळोवेळी एवढे तोंडघशी पाडून देखील पाकिस्तानचे मनसुबे कधी सुधारले नाहीत.
पाकिस्तानला धडा शिकविण्यात आपल्या सैनिकांनी कधीच कसर सोडलेली नाही. यांपैकीच एक सैनिक म्हणजे लेफ्टनंट रामा राघोबा राणे!! पाकिस्तानला चोख उत्तर देण्यासाठी त्यांना परमवीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले होते.







