"असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी" हे काही खरं नसतं. हरीने तरी कुणाकुणाकडे पाहावं ना? त्यामुळं स्वतःची लढाई स्वतःच लढावी लागत असते. ही गोष्ट अनेक लोकांना खूप वर्षं घालवूनही कळत नाही. पण एका १८ वर्षांच्या तरुणाला मात्र ही गोष्ट चांगलीच कळाली होती.
परिस्थितीला दोष देत बसून राहिले तर कुणी आपल्याला मदतीला येत नसते.
राजस्थानचा पार्थ द्विवेदी नावाचा तो तरुण!! मेंदूचा अतिशय दुर्मिळ असा आजार त्याला झाला आहे. जीवघेणा आजार झाला आहे म्हणून त्याने हार मानली नाही. २७ सप्टेंबरला त्याने दवाखान्यातून एक दिवस सुटी घेतली कारण त्याला जेइइ ऍडव्हान्स ही परीक्षा द्यायची होती. ५ ऑक्टोबरला या परिक्षेचा निकाल आला. या मुलाने पूर्ण भारतात चक्क ३५ वा क्रमांक त्याने मिळवला आहे.






