(प्रातिनिधिक फोटो)
जुने-जाणते म्हातारे सांगून गेले आहेत. त्यामुळे कोर्टाची आणि कचेरीची पायरी शहाणा माणूस चढत नाही. हे किती खरे आहे ते ज्याला अनुभव आहे त्यालाच विचारा मंडळी!! जर फक्त काही तासांसाठी कुणाला जेलमध्ये रहावे लागले, तर तो डाग आयुष्यभर पिच्छा पुरवतो. म्हणुन कुणालाच जेलमध्ये जाणे चांगले वाटत नाही. पण काही महारथींसाठी जेल म्हणजे दुसरे घर असते. पण त्यांची गोष्ट वेगळी. सर्वसामान्य माणूस या सगळ्या गोष्टींना घाबरूनच असतो. पण युपीवाल्यांची बातच न्यारी असते राव!! तिथे लोकं स्वतःहून अटक करवून घेत आहेत. तिकडे हा ट्रेंडच सुरु झाला आहे.








