मंडळी प्लास्टिक किती वाईट आहे सांगायची गरज नाही. म्हणूनच सरकारने प्लास्टिकवर बंदी घातली आहे. प्लास्टिकच्या कमीत कमी वापराने आपण पर्यावरण वाचवण्यात हातभार लावू शकतो हे आता तुम्हांला सांगण्याची गरज नाही.
पण हा संदेश खोलवर रुजवण्यात सोशल मीडियाचा पण मोठा वाटा आहे राव!! प्लास्टिकमुळे येणाऱ्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. चेन्नई महापालिकेने तर लोकांनी प्लास्टिक वापरणे बंद करावे यासाठी थेट मोहीम सुरू केली आहे. पण सध्याच्या काळात समुद्रातसुद्धा माशांपेक्षा प्लास्टिक जास्त दिसायला लागले आहेत राव!! काही दिवसांपूर्वी समुद्राने मुंबईकरांनी फेकलेला सगळा कचरा परत बाहेर फेकला होता. तर त्या कचऱ्यात सगळ्या प्लास्टिक बॉटल, प्लास्टिक कॅरीबॅग होत्या. या सगळ्या गोष्टी बघता प्लास्टिकमुळे होणारे धोके मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत.










