मंडळी, आज बोभाटा एका निराळ्या पण तितक्याच महत्वाच्या गोष्टीकडे तुमचे लक्ष वेधणार आहे. तसं पाहिलं तर ही गोष्ट साधीसुधी नाही, कारण अनेकांच्या आयुष्याचा तो प्रश्न आहे.
किरणोत्सर्गी पदार्थांवर नेहमीच चर्चा घडत असते. त्याचा मानवावर आणि एकूणच निसर्गावर पडणारा प्रभाव आणि परिणाम, त्याचे उपयोग आणि त्याचा धोका इत्यादी मुद्दे चर्चेत असतात. आज आपण अश्याच भारतातील युरेनियम खाणीची एक विदारक कथा समजून घेणार आहोत.





















