"मिलो ना तुम तो हम घबराये, मिलो तो आंख चुरायें|हमे क्या हो गया है?" हे गाणं तुम्ही ऐकलं असेल. बरं, हे आठवत नसेल तर "'ये दुनिया ये महफिल मेरे काम की नहीं"' हे तर नक्कीच आठवत असेल. आज आम्हाला या गाण्यांची आठवण होण्याचं कारण असं आहे की ज्या चित्रपटातील ही गाणी आहेत त्याचं नाव आहे 'हीर-रांझा'.
१७६६ साली वारीस शहा नावाच्या एका सूफी संप्रदायातील कवीने हीर-रांझाची प्रेमकहाणी कवितेत गुंफली आहे. या काव्यातील एका महत्वाच्या संदर्भाने आपल्याला दरवर्षी करोडो रुपयांच्या परकीय चलनाची प्राप्ती होते आहे. आता, १७६६ सालची प्रेमकहाणी आणि करोडो रुपयांची कमाई हे वाचून तुम्ही आम्हाला वेड्यात काढलं असणारच. पण आजचा हा लेख वाचला तर सगळा उलगडा होईल, पण त्यासाठी आपल्याला १९९७ पर्यंत मागे जावे लागेल.








