भारत हा शेतीप्रधान देश आहे. शेतीमध्ये अनेक तरुण शेतकरी नवनवीन प्रयोग करत असतात. शेतात नवीन प्रयोग करून आपले पिक कसे सकस होईल हा त्यांचा प्रयत्न असतो. असाच एक यशस्वी प्रयोग पुण्यातल्या दौंड तालुक्यातील तरुण शेतकरी संदीप घोले यांनी केला. त्यासाठी त्यांना नुकताच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आदर्श शेतकरी पुरस्काराने गुजरात येथे सन्मानित करण्यात आले आहे. काय काही हा प्रयोग? पाहुयात आजच्या लेखात.
संदीप घोले हे पुणे जिल्ह्यातील असलेल्या दौंड तालुक्यामधील पाटस गावाचे रहिवाशी आहेत. बारावीनंतर त्यांनी शेती व्यवसाय करत असताना बाहेरुन आपले पदवीचे शिक्षण पुर्ण केले. त्यांनीही पारंपारिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली. तिथे उसाची शेती केली जायची. पण काहीतरी वेगळं करावं असं मनाशी ठरवून त्यांनी कांदा शेतीकडे आपला मोर्चा वळवला. मात्र कांदा पीक नाशवंत असल्यामुळे शेतकरी कमी दरातही कांदा विकून टाकतो हे त्यांच्या लक्षात आले. फेकण्यापेक्षा कमी दरात विकेलेला बरा, असा कांदा उत्पकदांचा विचार असतो.








