माजी आयएसआय प्रमुख ‘मोहम्मद असद दुर्रानी’ यांचं पुस्तक ‘द स्पाय क्रॉनिकल्स : रॉ, आयएसआय अँड द इल्युजन ऑफ पीस’ भारत पाकिस्तान संबंधांवर मोठा प्रकाश टाकतं. यात अनेक वादग्रस्त गोष्टी आहेत. पण यात काही महत्वाचे खुलासेसुद्धा केले गेलेत. यात उल्लेखलेला एक कबुलीजबाब भारतासाठी महत्वाचा आहे भाऊ.
मोहम्मद असद यांनी पुस्तकात एक खुलासा करताना म्हटलंय की आम्ही भारतासमोर २ प्रसंगांमध्ये हार मानली. हे प्रसंग म्हणजे १९६५ आणि १९७१ चं युद्ध. मंडळी, चला जाणून घेऊ या दोन युद्धांत असं काय घडलं की पाकिस्तानने पराभव पत्करला !!






