सोनभद्र येथे ३००० टन सोनं सापडल्याची बातमी प्रचंड व्हायरल झाली होती. ही बातमी खोटी आहे हे काही तासातच उघडकीस आलं. ही बातमी आम्हीही दिली होती हे आम्ही मान्य करतो. त्याबद्दल माफीही मागतो.
तर, ही बातमी जवळजवळ सगळ्याच आघाडीच्या पोर्टल्सनी दिली होती. त्यामुळे त्यावर लोकांचा विश्वासही बसला. एकाचवेळी या सर्व पोर्टल्सनी खोटी बातमी कशी दिली? खरी बातमी काय होती? या सर्व गोष्टी आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत.









