(प्रातिनिधिक फोटो)
ग्लोबलायझेशन हा शब्द सध्या चलनी नाण्यासारखा वापरला जातो. पण ग्लोबलायझेशन गेली अनेक शतके व्यापारी, धर्मगुरू, हौशी प्रवासी आणि मुलूखगिरी या चार पध्दतीने होत होतं. या मालिकेलेतील हा पहिला लेख आहे सुंदरजी शिवजी या घोड्याच्या सौदागराबद्दल.
या कथेचा काळ आहे अठराव्या शतकातला. तेव्हा ब्रटिश ईस्ट इंडिया कंपनी हळूहळू भारतात हातपाय पसरत होती, मद्रास, मुंबई आणि कलकत्ता या शहरात कंपनीने चांगला जम बसवला होता, इतर ठिकाणी राजाश्रय मिळवून व्यापार वाढत होता, कंपनी सरकारची फौज तयार होत होती, त्या काळातली ही कहाणी आहे.











