२०१३ सालचा हिमाचल राज्यातला महापूर आठवतो का ? हो तोच तो महापूर, त्याच्यावर आधारित केदारनाथ नावाचा चित्रपट तुम्ही बघितला असेलच. एका रात्रीत पडलेल्या पावसाने केदारनाथमध्ये आलेल्या महापुरात जवळजवळ ३ लाख लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले. ‘एनडीआरएफ’चे (National Disaster Response Force) जवान, ITBP चे २००० निष्णात सैनिक आणि लोकसहभागातून बहुतेकांचे प्राण वाचले. या सर्वांना जोडणारी उत्कृष्ट दूरसंचार व्यवस्था उपलब्ध असल्याने दुर्घटनेच्या वेळेस वेळ वाया न जाता ही मोहीम यशस्वी झाली. पण विचार करा वर उल्लेख केलेले मदतीचे हात जर उपलब्ध नसतील तर अशा प्रलयकारी पुरात काय झालं असतं?
काय झालं असतं? असा जर विचार तुमच्या मनात आला असेल तर १९७९ साली गुजरातमधल्या मोरबीत आलेल्या पुराची कथा वाचली की एका रात्रीत होत्याचे नव्हते कसे होते याची खात्री तुम्हाला पटेल. पण ही कथा वाचण्याआधी २ संकल्पनांचा आपण विचार करूया.





















