शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, ही गोष्ट या कोरोनाकाळात सिद्ध झाली आहे. पण तरीदेखील ज्या प्रमाणात पीक येते त्याच्या तुलनेने भाव मात्र शेतकऱ्यांना मिळत नाही. १२ महिने घाम गाळून, पीक वाढवून देखील भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांना होणारा त्रास मोठा असतो.
कालपासून एक बातमी सगळीकडे दिसतेय. डोक्यावर चक्क पैशांचे बंडल घेतलेला एक शेतकरी दिसत आहे. फोटो जरी खोटा असला तरी गोष्ट खरी आहे. शेतीमध्ये खरोखर सोने पिकवले म्हणावे अशी ही गोष्ट आहे. चला तर खऱ्या शेतकऱ्याला भेटू आणि खरी गोष्ट जाणून घेऊ!!







