शाळेत मन लागत नाही म्हणून इतर उपद्व्याप करणारी मुले तुम्ही बघितली असतीलच. आजची गोष्ट अशाच एका मुलाची आहे. त्याचं शाळेत लक्षच लागत नसे, मग मित्राच्या मदतीने मोबाईल रिपेयर करत बसायचा. आई वडिलांना ही गोष्ट समजली तेव्हा साहजिकच अभ्यासाच्या वयात मुलगा दुसरेच उद्योग करतोय बघून त्यांनी त्याचं सगळं सामान फेकलं. पण आईवडिलांची कितीही इच्छा असली तरी मुलाची अभ्यासात गतीच नव्हती तर तो तरी काय करणार. त्याने कॉल सेंटरमध्ये नोकरी सुरू केली. तिथे त्याला ८००० रुपये पगार मिळू लागला. पुढे जाऊन हा मुलगा आणि त्याच्या सारखाच असलेला त्याचा भाऊ अब्जाधीश झाले. हा एवढा मोठा बदल कसा घडला? अविश्वसनीय वाटत असली तरी ही गोष्ट खरी आहे.
आता वळूया या गोष्टीतील त्या दोन नायकांकडे








