भारतीय संस्कृतीत रामायणाला अढळ स्थान आहे. फक्त भारतीय संस्कृतीच नाही तर रामायणाच्या कथेने आशियातील मोठ्या भूभागावर आपला प्रभाव पाडला आहे. वाल्मिकी ऋषींनी साधारण २५०० वर्षांपूर्वी रामायण लिहिलं. हे रामायण व्यापारी, प्रवासी यांच्या मार्फत संपूर्ण आशिया खंडात पोहोचलं.
परिणामी रामायणाने भारतासोबत मलेशिया, चीन, म्यानमार, फिलिपाईन्स या देशांवर तर प्रभाव पाडलाच, पण रामायणाची अनेक रूपे तयार झाली.












