काळाच्या ओघात अनेक बदल होत जातात. जगाचा नकाशा सुद्धा काळाच्या ओघात अनेकदा घडलाय आणि बिघडलाय. जगाला गदागदा हलवणारी दोन महायुद्ध होऊन गेली. या युद्धांनी जागचा चेहरामोहराच बदलला. या ओघातच काही नवीन देश तयार झाले तर काही देश कायमचे मिटले गेले. आता आपलंच उदाहरण घ्या ना राव. ब्रिटीश गेल्यानंतर आपल्या देशाचे दोन तुकडे झाले आणि पाकिस्तान तयार झाला. जगात इतर काही देशांच्या बाबतीतही असंच काहीसं घडलं आहे.
आज आपण ८ अशा देशांची ओळख करून घेणार आहोत जे कधीकाळी अस्तित्वात होते. आज या देशांची कोणतीही खुण शिल्लक नाही !!
चला तर इतिहासात मागे जाऊया आणि नसलेले राष्ट्र फिरून येऊया !!











