सध्या देशात बरेच सर्व्हे करण्यात आले. या सर्वेक्षणांत सर्वात स्वच्छ राज्यापासून प्रशासकीय कारभारांपर्यंत वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घेण्यात आला. वेगवेगळ्या राज्यांनी वेगवेगळ्या विभागांत पुरस्कार पटकावले आहेत. आज जाणून घेऊयात कुठलं राज्य कशात अग्रेसर आहे आणि त्यांत कुणाला कोणते मान मिळाले आहेत!!
१. सुरुवात करु स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार २०२० पासून. या सर्व्हेनुसार सालाबादप्रमाणे भारतातल्या सर्वात स्वच्छ शहराचा मान सलग चौथ्यांदा इंदौरला मिळाला आहे. इंदौरकडून राखले गेलेले हे सातत्य खरोखर कौतुकास्पद आहे.










