प्रत्येक गावाची एकदम 'पेश्शल' अशी ख्याती असते. चादरीसाठी सोलापूर, संत्र्यासाठी नागपूर, शिक्षणासाठी पुणं, पैशासाठी मुंबई . हे आम्ही महाराष्ट्रपुरतंच बोलतोय असं नाही. प्रत्येक राज्यात आशा अनेक शहरांची खास अशी ओळख असते. ही ओळख त्या-त्या गावाची, शहराची शान असते. त्या गावाच्या संस्कृतीचा आणि अस्मितेचा तो अविभाज्य भाग असतो.
उदाहरण घ्या सुरत किंवा राजकोटचं. सुरत हिऱ्याची जागतिक बाजारपेठ समजली जाते तर राजकोट दूध, तेलबिया, किराणा यांच्या व्यापारासाठी! पण या दोन्हीही गावांची बाजारात एक वेगळीच ओळख आहे ती म्हणजे ही शहरं जुगारासाठी म्हणजे सट्टा बाजार म्हणून (कु) प्रसिद्ध आहेत.









